Thursday, 7 April 2016

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता...

Maa,

It was this day only...when you left the physical form.
I am still haunted by the same feeling of being powerless and lost in this world without you, which I had experienced that day for the first time....

I haven't still recovered, feels like to cry aloud. Please give me strength..
Love you forever maa... badly need your love!! :(

Remembering you,
Your son

Wednesday, 22 July 2015

अचानक

फोन हातात घेऊन चालतोय.
आईशी बोलाव वाटल अचानक...
काय डायल करू.. साला तिचा फोन नम्बरच नाहिये!
:( feeling very sad! And helpless!!!

Saturday, 4 July 2015

आई १

औरंगाबाद ला कॉलेजात शिकत असताना अधून मधून अंबाजोगाई ला घरी येन व्हायच. पण बऱ्याचदा महीनोन महीने मी घरी फिरकायचो नाही. कॉलेज, मित्र, निरनीराळया उचापती यातच मशगूल असायचो.
घरी आल्यावर देखील, लहानपनीचे मित्र खूप दिवसांनी भेटायचे म्हणून दिवस रात्र त्यांच्यासोबत मस्ती चलायची.

रोजच रात्रि घरी परतायला खुप उशीर व्हायचा. माझ्यामागे गेट बंद करायला म्हणून पप्पा जागे राहायचे तर मी जेवतो की नाही हे पाहायला आई जागी असायची.

एक रात्रि नेहमीप्रमाणे मी उशिरा घरी आलो.
घरी कदाचित टिंकुची आवडती बटाटयाची भाजी केलेली असावी. त्याने ती पूर्णच संपवली होती.

आई म्हणाली काही करुन देते. मी नको बोललो व घरात काय असेल ते दे अस सांगितल.

दूध होत. दिवसभर तापुन वापरून घट्ट झालेल दूध.
ते थोड़ गरम करुन पातेल्यातच ज्वारिचि भाकरी मी कुसकरून खाल्ली. आई पहात होती, तिला वाईट वाटत होत की मला कदाचित न आवडनार अस काही खाव लागत आहे.
पण ती दूध भाकरी खरच खूप चविष्ट लागली होती. आधी कधी दूध अस आवडल नव्हतच.
मी आई ला सांगितल की आता रोज रात्रि मी हेच खानार, वेगळ काही करायची गरज नाही. तिला आश्चर्य वाटल, कदाचित अविश्वास देखील.

कसोटी दुसऱ्या रात्रि होती.

पण त्या रात्रिपासून मी रोज भाकरी आणि दुधच खाऊ लागलो. लेट यायच, दूध कड़क तापवायच, त्यात उरलेल्या सर्व भाकरी कुस्करायच्या आणि पातेल चाटून पुसून खायच..

आई पहात असायची. तिच्या चेहऱ्यावर समाधान की काहीतरी दिसल्याच् आता आठवत. मंद हसत ती मला जेवताना पाहायची. उरलेल्या शिळया भाकरीच उद्या काय कराव की नेहमीप्रमाणे स्वत: खावि, उरलेल्या दुधाच उद्या काय कराव या गोष्टींची काळजी तिला कदाचित करावी लागत नसेल. आणि त्यातच ती किती खुश व्हायची. खरच आया वेड्या असतात किती..

तीच ते मंद हसु कदाचित मी त्यावेळिच अनुभवायला हव होत.. पण मी माझ्याच विश्वात हरवलेला असेल तेव्हा.. आता सोबतिला फ़क्त जर-तर आणि उसासे.

आज पुण्यातल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत फुटपाथवर बसून हे सर्व या ब्लॉग वर उतरवताना, ही जाणीव खुप होतेय की.. इतक्या गर्दीत बसून देखील जानवणाऱ्या एकटेपनातही मला एकट न वाटू देण्याच् सामर्थ्य आहे केवळ तिच्यात!

परीट आणि कोळसेविक्या

एकदा एका गावात एक कोळसेविक्या नवीन जागी दुकान टाकतो. त्याच्या शेजारीच चिकटूनच एका परीटाच दुकान असत. 

साहजिकच शेजारी असल्याने आणि पोटासाठी धंदा करणाऱ्या त्या दोघांची दोस्ती होते. कामानिमित्त त्या दोघांनापण बाहेरगावी जाव लागे. 

चांगली मैत्री झाल्यावर एके दिवशी कोळसेविक्या परिटाला म्हणतो, "मित्रा, आपण दोघेपण बाजारहाटासाठी बाहेरगावी जातो त्यात खर्च तर होतोच पण एकट जायला-यायला कंटाळवाण पण वाटत, जर आपण एकत्र गेलो तर पैशांची पण बचत होईल आणि वेळ पण छान जाईल."

      त्यावर परीट म्हणतो, "तू म्हणतोस ते खर आहे मित्रा पण आपल कामाच स्वरूप काही अस करायला योग्य आहे अस मला वाटत नाही आणि मला वाटत झाली तितकी दोस्ती बस झाली आता आपण दूर राहिलेलच बर."

      परीटाने काही दिवसात ती जागा सोडून नव्या जागी बस्तान हलवले.


- इसापनीती

Friday, 3 July 2015

चार ओळी

ती:
तुला जाणवत का रे...
        चांदण्यांना हि वाटत असेल का
     कधी चंद्राजवळ जाव..?
                दूर असूनही
           फक्त त्याचच रहाव..?

तो:
असच होईल ग..
        मनात आणशील तर,
     हे तारांगण फुलेल तुझ्या अंगणी..
                सौभाग्यवतीच्या कुन्कुवासमान    
           शोभून दिसेल शुक्राची चांदणी...

सखे

सखे,
वाट शोधलिये मी माझी
पण ती इतर कुणाची नाहीये
ध्येय तर दिसतय
मार्ग दिसेना... दिसतात फ़क्त
काटे अन खाच-खळगे
माझी वाट मलाच शोधायचिये... बनवायचीये...
अनंत कष्टाना सामोर जाव लागेल मला
हे करताना...कदाचित
पाय रक्तबंबाळ होतील, हात सोलवटून निघतील...
सखे, घेशील का ग तू ते हात तुझ्या हातात..
एक मायेची फुंकर घालण्यासाठी...
त्या रक्ताळलेल्या पाउलखुणा पाहून
तुझ मन धझावेल का माझी साथ देण्यासाठी...
अन, अडथळा म्हणून जेव्हा येईल
तुझाच इतिहास आपल्या मार्गात
अन माझ्या मनात असेलच करावा
तोही पार, करून त्याच्याशी दोन हात...
सखे, असशील का ग तू... माझ्या सोबत...

माझ्या बाजूलाच...ठाम.?

एक पत्र

गुऱ्या,

काय लिहू कळत नाही..... काहीही लिहायला बसल कि माझी हि सुरवात ठरलेलीच आहे अस वाटायला लागलंय आता.. सगळा पांचटपणा..

अस वाटतंय संपल माझ सगळ बोलून. हे मराठी टायपिंग मस्त आहे, आधी पण वापरलं होत पण विंडोज सेवन मध्ये जास्त फ्रेंडली वाटतंय. असला काहीतरी शोध तुम्ही लावायला पाहिजे होता.
आजपण खूप बोर होत आहे, नेहमीचच झालंय तस... अस लिहायला पण ऑड वाटतंय यार, पेपर घाण करायची मजा वेगळीच असते, इथ कस सगळ सुटसुटीत, मोकळ, स्वच्छ, खोट-खोट.... पेपर मस्त असतो, तो मला माझा वाटतो, जवळचा...माझ्या लाइफ सारखा...कॉम्प्लिकेटेड..आडव्या-तिडव्या रेघोट्या मारता येतात, हवी तिथ हवी तशी गिचमिड करता येते, एकदा शाई उमटली कि झाल, परत माघार नाही, तिला घेऊनच पुढ जाव लागत. शेवटी जे उरणार आहे जे निर्माण होणार आहे त्याचा ती प्रत्येक गोष्ट भाग असते,चांगलीपण वाईटपण... तसच आपल्या आयुष्याच पण आहे न, एकदा गोष्ट घडली कि घडली परत माघार नाही.. वेळ एकदाच येते. त्यात जे होईल ते होईल.. पुढ त्यासोबतच जगाव लागत, खोडरबर नाही ना डिलीट च बटन नाही...रिस्टार्ट तर मुळीच नाही. म्हणून मला पेपर वर पण पेन्सिल आवडते, पण जीवनासोबत ती कधी वापरता आलीच नाही. पण कदाचित त्यामुळंच आयुष्यात मजा असेल.

मॅचुरीटी कधी येईल का रे माझ्यात... का मी असाच आहे आणि असाच असण्यासाठी मी असा आहे? पण मुळात मी का आहे हेच कळत नाहीये मग असा का तसा का काय फरक पडतो, बघायला गेल तर जवाबदारया खूप आहेतच कि, पण कुठ काय गफला होतोय समजत नाहीये. काहीच व्यवस्थित आहे अस वाटत नाहीये. नाहीच आहे....

हे सगल इल्युजन असाव...मला खूप बर वाटेल.

माझ्यात काही स्पिरीट राहीलच नाही अस झालंय, कशात काही अॅम्बिशण राहिलीच नाही, रस राहिला नाही... उगी ढकलत चाललोय स्वतःला. प्रोब्लेम आले फेस करतोच आहे, हातपाय गाळून बसत नाही अजून, पण काहीतरी कमी आहे, खूप महत्वाच काहीतरी मिसिंग आहे आता....

झोपलो आता...झोपून टाईप करतो. बट काय बोलू नाही कळत ए...

आतापर्यंत काहीतरी सेटलमेंट, काहीतरी अचिव्हमेंट पाहिजे होती यार सगळच फिस्कटलय... मोठ्या उमेदीने आलो होतो स्पर्धा परीक्षेची तयारी करायला, स्वतःला बदलायचं होत जग बदलण्यासाठी....सगळच फिस्कटल आता. वेळ आहे अजून पण उमेद नाही ती आता... वाटत कधीकधी सगळ सोडून निघून याव तुमच्याकड पण काय माहित तिथ येऊन पण काय विचार करेन मी आणि काय मिळवेल काय गमावेल. आणि असहि वाटत न कि सोपा पर्याय तर कुणीही निवडेल, पळून जाण तर सोपच आहे, आणि मी स्वतःला-स्वताच्या परिस्थितीला पाठ दाखवून पळालो तर ती जाणीव घेऊन मी निट राहू शकेल का? इकडे काही करू शकलो नाही म्हणून तुझ्या आश्रयाला आलो हि जाणीव घेऊन मी जगू शकत नाही. मला इथच शिकाव लागेल, मी इथ चुकतोय मला इथच सुधाराव लागेल. ते म्हणतात न जे जीथ हरवलं ते तिथच शोधाव लागत.

अस वाटतंय पूर्ण आयुष्य जगलोय मी, काही राहील नाही. ध्येय नसलेल आयुष्य मलाच कधी पटल नाही, ते कधी माझ्या वाट्याला येईल अस वाटल पण नाही. पण आहे....आता.

आई गेली, पण खूप काही देऊन खूप काही शिकवून गेली ती, अखेरच्या काळातही खूप काही दिलं तिने ते मी कस वाया जाऊ देऊ.... तिने विश्वासाने ज्या गोष्टी मला शिकवल्या त्या सोडून कशा देऊ? हरन तिने कधीच शिकवलं नाही, मृत्यू समोर असताना ती कधी मनाने हरली नाही, त्याही परिस्थितीत तिने जिवनाच खूप मोलाचं तत्वज्ञान मला दाखऊन दिल. मला तो वारसा पुढ न्यायचाय.

                       मी..... नक्कीच अस म्हणणार नाही कि खचून जाण्याच्या सगळ्या पायऱ्या मी उतरलोय, त्या नशीबाला म्हणा तुला अजून खूप झटाव लागेल मला तितक् खाली खेचायला आणि तरी तू जिंकशीलच अस नाही. मी इतका सोपा नाही जिंकायला. आहे अजून डोक जागेवर माझ,थोड भटकतय इतकच.

काय सांगू गुऱ्या (मी खूप खुश झालो होतो जेव्हा हे गुऱ्या जी यु आर वाय ऐ टायीप केल कि हव तस प्रिंट झालेलं पाहून)
माझ्या डोक्यात इतका कचरा झालाय ना कि कामाच्या गोष्टी काढून मी त्यावर लक्ष केंद्रित नाही करू शकत आहे, कामाची गोष्ट बाहेर काढली ना कि ती या कचरयानि बरबटलेलीच असते. बळजबरी मी मनावर ना कधी करू शकलोय ना अजूनही करू शकेल अस वाटतंय. मनाविरुद्ध नाही वागता येत मला, आणि जर वागलोच तर त्याचा उपयोग होत नाही, फक्त वेळ वाया गेलेला असतो मग. पूर्ण तयारीने, पूर्ण ताकद लावून नाही रे मी अजून या परीक्षा देऊ शकलो, नेहमी काहीतरी कारण आहेच, या कारणांना मीच कंटाळलोय. ज्या ताकदीने ज्या उमेदीने आपण सोबत असताना काही गोष्टी करायचो, तहान-भूक विसरून फक्त त्याच गोष्टीचा ध्यास असायचा, झोपेत जागेपणी तेच विचार, काम कस तडीस नेता येयील, कस ते परिपूर्ण राहील... तस मी अजूनही नाही स्वतःला पाहू शकलो इकडे...त्याच्या अर्धदेखील नाही. तो वेडेपणा कुठ हरवलाय कि.... खूप गरज आहे त्याची.
विचार करून, सल्ले घेऊन, प्लान करून हाती काही लागत नाहीये, फिझीकल सिग्निफिकंस असलेल एखाद माझ बटन हरवलय आणि तेच प्रेस करायची गरज आहे.. इतर काहीही वर्क नाही करत आहे.
पण मी करणार आहे, मला माहित नाही कस ते, पण मी मधेच सोडणार नाही.... वेळ लागेल कदाचित, पण मला माझा मार्ग स्वतालाच काढावा लागेल. माझा कागद चुकांनी कितीजरी भरून गेला तरी त्या रेघोट्याना पुढ नेवून त्यापासूनच एक छानस चित्र मला उभ करायचय. आज दिसत नसल तरी ते त्या चुकांमधेच लपलेल असाव......

                                                मी परत सुरवात करतोय....



मला अजून बोलाव वाटतंय पण काय ते नाही सुचत, सो थांबतो....